मनु आणि मल्हार जेव्हा गायनँककडे गेलेले असतात तेव्हा मनु अँबार्ट करण्याबद्दल विचारते तेव्हा ती गायनँक सांगते की ती वेळ आता निघून गेली आहे आता ते शक्य नाही,आणि म्हणून मनु आणि मल्हारच लग्न हा एकमेव पर्याय मीरा आणि आदि समोर राहतो.
इतक सोप दाखवल असत तर लग्नाच कारण जस्टिफाय झाल असत.
पण निनावे बाईंनी मीरा आणि आदिला मनु मल्हारच लग्न लावताना एकत्र आणण्याचा घाट घातला आहे.😡
आणि दुसर म्हणजे आदि स्वत:वरून मल्हारला जज करत आहे आणि
मीरालाही सांगत आहे.पण मल्हारसाठी मनु ही मजा होती,हे त्यानच सांगितलेल असत .पण मीरा आदिसाठी कधीच मजा नव्हती.म्हणूनतर ती गेल्यावर आदिला डिप्रेशन होऊन सायकँटँरिस्टची ट्रिटमेंट घ्यावी लागली होती.
मग हा डॉक्टर मीराला असा सल्ला का देत नाही की घाबरलेल्या मनु आणि मल्हारला आपण मानसोपचारतज्ज्ञा कडे घेऊन जाऊ.
आजकाल सेक्स,दारु,वन नाईट स्टँड ,लिव इन रिलेशनशिप या गोष्टी केवळ उच्चभ्रु समाजापुरत नाही तर अगदी पांढरपेशा समाजापर्यंत पोहोचले आहे,अशात भरकटलेली कितीतरी तरुण मुल मुली मानसोपचारतज्ज्ञा कडे जातात.
मग हे डॉक्टर असूनही हा मार्ग का नाही निवडताना दाखवत, ते दाखवता दाखवताही मीरा आदि एकत्र येतात असही दाखवता येईल.
पण परत निनावे😡
कालही खरतर आजोबा आणि मल्हारचे वडील बरोबर होते.
पण आता आदिला बहुतेक फिलॉसॉफर दाखवायच आहे,म्हणून आजोबि जेव्हा अँबॉर्टचा सल्ला देतील तेव्हा आदितला गायनँक जागा होईल आणि सांगेल की ते शक्य नाही.
तोपर्यंत आदिला मीराच्या प्रेमात वेडा झालेला लव्हरच दाखवायच निनावे बाईंच ठरलेल दिसत आहे.
1.2k